Posts

Showing posts from June, 2016

दोष नाही

शाप होता चांदण्याला तो ढगांचा दोष नाही, वेळ होती ओहटीची सागराचा दोष नाही. छेडल्या तारा तरीही सूर नाही वाजले, का फुलाच्या लाजण्याने हात माझे भाजले. हात होते छेडणारे तो फुल...

एक सुंदर संध्याकाळ

ना जाणे क्यु .......  संध्याकाळची वेळ, काम करून करून कंटाळा आलेला, थोडासा fresh व्हावं म्हणून गरमागरम चहा चा cup घेऊन खिडकीत आलो. बाहेर काळेकुट्ट ढग दाटून आलेले. आता थोड्याच वेळात पाऊस पडेल हे सांगायला वेधशाळेची गरज नव्हती. काळ्याकुट्ट ढगांच्या साम्राज्याने अस्ताला जाणारा सूर्यही झाकोळला. त्या ढगांची वर आकाशात झालेली गर्दी उदासीनता आणून गेली आणि मनात अनेक विचारांनी गर्दी केली. विचार सहाजीकच “ती” च्या बद्दलचे. काय विचार? विचार कसले प्रश्नच नुसते.. काय करत असेल ती? ती पण अत्ता चहा घेत अशीच खिडकीत बसली असेल का? तिकडेही असच वातावरण असेल का? असे एक न अनेक प्रश्न. पण का विचार करतंय मन या सगळ्याचा? काय उपयोग आहे याचा? पण उत्तरं कुठेच नाहीत. फक्त प्रश्न. विचारांच्या तंद्रीत चहा चा cup तसाच हातात. इतक्यात पाउस सुरु होतो. दुपारच्या उन्हात तापालेल्या धरतीवर पावसाचे थंडगार थेंब पडतात आणि धरतीमातेला एकदम शांत करून जातात. ओल्या मातीचा सुगंध साऱ्या वातावरणात पसरतो. त्या सुगंधाने मन थोडं हलकं होतं पण मनातलं वादळ काही क्षमत नाही. इतक्यात  व्हाट्सअँप आयकॉन वाजतो आणि मनात चालले...